दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते. तुळशी विवाहापूर्वी देवउठणी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. तुळशी विवाहाची पौराणिक कथा आणि महत्व जाणून घ्या…
तुळशी विवाहाचे महत्त्व
तुळशी विवाहानंतर लग्नासारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त सुरू होतात. या विवाहामुळे कन्यादान केल्याचे पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीचे रोप हे पवित्र मानले जाते आणि विष्णूचा शालिग्राम अवतार याच्याशी तिचा विवाह लावणे हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक कार्य मानले जाते. तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी किंवा द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. तुळशी विवाहाचे महत्त्व हे वृंदा (तुळस) आणि भगवान विष्णू (शालिग्राम रूपात) यांच्या विवाह सोहळ्यात आहे, जो कार्तिक महिन्यातील एकादशी किंवा द्वादशी ते पौर्णिमेदरम्यान साजरा होतो. या विवाहामुळे कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते आणि यानंतर लग्नाचे शुभमुहूर्त सुरू होतात.

तुळशी विवाहाची कथा
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











