पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाद्दल नवी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये 19 नोव्हेंबरला मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या 20 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे. दरम्यान आता आगामी तीन दिवसांमध्ये योजनेचा 21 वा हप्ता वितरीत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र काही शेतकरी या 21 व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
21 व्या हप्त्यापासून ‘हे’ शेतकरी वंचित राहणार
केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या 21 व्या हप्त्याविषयीची सुचना देण्यात आली आहे. म्हणजे दोन दिवसानंतर 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा होणार आहे. पण सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. तर जे लाभार्थी आहेत, पण त्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली नसेल, त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा नवीन हप्ता मिळणार नाही.

- ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, ते वंचित राहतील.
- भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अथवा अर्धवट ठेवली आहे.
- बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला, तर पैसे मिळणार नाहीत.
- बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला, तर वंचित राहावं लागेल.
- नावाचे स्पेलिंग अथवा आधार चुकीचा असेल तरी पैसे मिळणार नाहीत.
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रू. येणार !
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 19 नोव्हेंबरला योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम पाठवली जाणार आहे. त्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये पाठवण्यात येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम पूरग्रस्त राज्यांना अगोदरच देण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना पूरस्थितीतून सावरण्यासाठी पीएम किसानच्या हप्त्याची 21 व्या रक्कम देण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.70 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 20 हप्त्यांचे एकूण 40000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले आहेत. पीएम किसान योजनेचे दोन हप्ते जारी करण्यामध्ये किमान चार महिन्यांचा कालावधी ठेवला जातो. त्यानुसार 2 ऑगस्ट 2025 ला पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. तेव्हा 20500 कोटी रुपये 9.7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाठवण्यात आले होते.











