Wedding Rituals : लग्नात वधू वराच्या डाव्या बाजूला का बसते ? जाणून घ्या यामागील कारणं

लग्नाच्या सर्व विधींमध्ये वधू वराच्या डाव्या बाजूला बसते. असे मानले जाते की लग्नाच्या पूजा किंवा हवनाच्या वेळी वधू वराच्या डाव्या बाजूला बसली तरच लग्न पूर्ण मानले जाते. यामागील कारण जाणून घेऊयात...

हिंदू परंपरेनुसार लग्नाच्या विधींमध्ये वधू वराच्या डाव्या बाजूला बसते आणि यालाच लग्न पूर्ण होण्याचं कारण मानलं जातं. वधूला डाव्या बाजूला बसवण्यामागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत, जाणून घेऊयात..

अर्धनारीश्वर

पुरुष आणि स्त्री हे अर्धनारीश्वराचे प्रतीक आहेत. अर्धनारीश्वरात अर्धा भाग शिवाचा आणि अर्धा भाग पार्वतीचा आहे. हे स्त्री आणि पुरुषाच्या एकतेचं प्रतीक आहे. म्हणून, लग्नाच्या वेळी वधू वराच्या डाव्या बाजूला बसते, कारण ती पुरुषाच्या डाव्या बाजूची अधिकारी असते, असे मानले जाते.

लक्ष्मी-नारायण आणि शिव-शक्तीचे प्रतीक

वधू डाव्या बाजूला बसते कारण ती लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते, तर वर हे नारायणाचे प्रतीक आहे. तसेच, हे शिव आणि शक्तीचे मिलन दर्शवते. हे एकीकरण पूर्ण झाल्यावरच विवाह पूर्ण मानला जातो. 

देवी लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला विराजमान असते. विवाहादरम्यान वधूला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि वराला विष्णूचे रूप मानले जाते. या कारणास्तव, वधू आणि वर यांच्यातील संबंधांसाठी सर्व विधी डाव्या बाजूला बसून करणे सर्वोत्तम मानले जाते.

हृदयाजवळ राहते

वधू वराच्या डाव्या बाजूला बसते, म्हणजे ती त्याच्या हृदयाच्या जवळ राहते, जे प्रेम आणि जवळीक दर्शवते. हे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे.

शिवाचे प्रतीक

भगवान शंकराच्या अंगातून स्त्रीची उत्पत्ती झाली, याचे प्रतीक म्हणून वधूला वराच्या डाव्या बाजूला बसवले जाते. यामागे ‘वामांगी’ (डावी बाजू) ही संकल्पना आहे. वधूसाठी ‘वामांगी’ हा शब्द वापरला जातो, ज्याचा अर्थ ‘डाव्या अंगाची’ असा होतो. हे तिच्या डाव्या बाजूला बसण्याच्या परंपरेवरून आले आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News