अनेक जणांना जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय असते. परंतु वास्तूशास्त्रानुसार, ताटात खरकटा हात धुतल्याने देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा नाराज होते, या गोष्टीचे वाईट परिणाम व्यक्तीला पुढे भोगावे लागतात. जाणून घेऊयात..
जेवणानंतर ताटातच हात धुवू नका
जेवल्यानंतर लोक त्याच ताटात हात धुतात. ज्या ताटात अन्न खाल्ले जाते, त्यात हात धुणे हे अशुभ मानले जाते. जेवण हे ‘पूर्णब्रह्म’ मानले जाते. ज्या ताटात अन्न खाल्ले, त्यात हात धुणे म्हणजे अन्नदेवतेचा अनादर करणे होय. वास्तुशास्त्रानुसार, जेवणानंतर त्याच ताटात हात धुतल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात आणि लक्ष्मी घरातून निघून जाते, ज्यामुळे घरात दारिद्र्य येते. या सवयीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

पलंगावर बसून जेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, पलंग किंवा सोफ्यावर बसून जेवण करणे अशुभ मानले जाते, कारण झोपण्याच्या ठिकाणी जेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते आणि आजारपण वाढू शकते. झोपण्याची जागा (बेडरूम) आणि जेवण्याची जागा वेगळी असावी. बेडवर जेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो. बेडरूम हे विश्रांतीचे ठिकाण आहे, तिथे जेवल्याने अन्नदेवतेचा अनादर होतो.
जेवणाची योग्य पद्धत
खाली आसनावर मांडी घालून जेवायला बसावं. जमिनीवर मांडी घालून जेवणे हे वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदानुसार उत्तम मानले जाते.यामुळे पचनक्रिया सुधारते. खाली बसून जेवल्याने शरीराला आराम मिळतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते असे मानतात. जमिनीवर मांडी घालून किंवा सुखासनात बसून जेवणे उत्तम. पाय पसरवून जेवल्याने पोटाच्या समस्या होऊ शकतात.
अन्न वाया घालवू नका
वास्तुशास्त्रानुसार ताटात गरजेपुरतेच अन्न घ्या. ताटात अन्न उरल्यास ते वाया घालवण्याऐवजी प्राण्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे घरात अन्न-धान्याची कमतरता भासत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











