हिंदू परंपरेनुसार, चपाती वाढताना शिस्त आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. थेट हातात न देणे, तीन चपात्या न वाढणे आणि ताजे पीठ वापरणे यांसारख्या गोष्टींमुळे घरात सकारात्मकता टिकून राहते. जेवणाच्या ताटात एकाचवेळी कधीही तीन चपाती वाढू नये असे म्हटले जाते. तसे करणे अशुभ मानले जाते. त्यामागे असणारे कारण बऱ्याच जणांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.
चुकूनही हातात चपाती देऊ नका
समोरच्या व्यक्तीच्या ताटातील चपाती संपल्यावर, दुसरी चपाती थेट हातात घेऊन देऊ नका. ती नेहमी एका वेगळ्या प्लेटमध्ये आणून ताटात ठेवा. असे करणे अशुभ मानले जाते.

एकत्र तीन चपात्या वाढू नका
एकाच वेळी ताटात तीन चपात्या वाढणे टाळा. यामागे धार्मिक कारणे आहेत आणि असे करणे अशुभ मानले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या तेराव्याच्या विधीपूर्वी, मृत व्यक्तीच्या नावानं ठेवलेल्या ताटात तीन चपात्या वाढल्या जातात. त्यामुळे ताटात तीन चपात्या वाढणं हे मृत व्यक्तीसाठीचं जेवण मानलं जातं. ताटात एकाच वेळी तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते. असे करणे टाळावे, कारण यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे.
शिळ्या चपात्या वाढू नका
शिळ्या (ताजे नसलेल्या) पिठापासून बनवलेली चपाती जेवणात वाढू नये, असे शास्त्र सांगते. योग्य प्रकारे चपाती वाढल्याने अन्नपूर्णा माता आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात, असे मानले जाते.
स्वच्छतेची काळजी घ्या
चपाती बनवताना आणि वाढताना जागा स्वच्छ ठेवावी. स्वच्छतेची काळजी घेणे हे आरोग्यासाठी आणि अन्नाच्या पावित्र्यासाठी महत्त्वाचे आहे. स्वच्छतेमुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
वास्तू आणि ज्योतिष
या नियमांचे पालन केल्याने घरातील कलह टळतात आणि आर्थिक स्थिती सुधारते, असे म्हटले जाते. अन्न हे देवाचे रूप मानले जाते, म्हणून ते आदरपूर्वक वाढावे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, म्हणून त्याचा अनादर करू नये. जेवताना ताटात जास्त अन्न वाढू नये, ते वाया घालवू नये.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











