Sankashti Chaturthi 2025 : संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या..

Asavari Khedekar Burumbadkar

प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटांवर मात करायची असेल, तर गणेश पुराणात गणपतीच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले आहे. संकष्टीचे व्रत पाळणाऱ्या भाविकांची संकटे दूर होतात, असे मानले जाते.

संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व

गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते, जो सर्व अडथळे दूर करतात; म्हणून या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटं टळतात. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, तर संततीप्राप्तीसाठी आणि मुलांच्या सुखासाठीही हे व्रत केले जाते. ‘संकष्टी’ या शब्दाचा अर्थच ‘संकटातून सुटका’ असा आहे. हे व्रत केल्याने गणपती सर्व अडथळे दूर करतात, अशी धारणा आहे. गणेश पुराणात कृतवीर्य राजाच्या कथेचा उल्लेख आहे, ज्याला अपत्यसुख नव्हते; नारद ऋषींच्या सल्ल्यावरून त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत केले आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली, असे सांगितले आहे. 

व्रत करणाऱ्यांना मिळणारे फायदे

  • मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
  • जीवनातील अडथळे आणि संकट दूर होतात, ज्यामुळे कामे यशस्वी होतात.
  • मानसिक शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक विचार येतात आणि मन प्रसन्न राहते.
  •  गणपतीची आराधना केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता येते. 
  • आरोग्य सुधारते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
  • बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते, ज्यामुळे आयुष्यात यश मिळते. 
  • या दिवशी गणपतीची पूजा, अथर्वशीर्ष पठण, गणेश स्तोत्र पठण केले जाते.
  • दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडला जातो. चंद्रदर्शन हे या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.
  • यथाशक्ती गरीब-गरजूना दान करणे शुभ मानले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या