मुंबईत अनेक घुसखोर स्थानिक नागरिकांच्या वेशात राहात आहेत आणि विविध क्षेत्रांत काम करत आहेत. यामुळे रोजगार, सुरक्षा आणि सामाजिक समतोलावर परिणाम होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासन या घुसखोरांवर काटेकोर नजर ठेवून कारवाई करत आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारने आता आणखी तगडे नियोजन आखले आहे. अशा परिस्थितीत आता मुंबईत अफगाणी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सहा अफगाणी नागरिक पोलिसांच्या अटकेत
मुंबई पोलिसांनी कुलाबा आणि धारावी येथून सहा अफगाण नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व अफगाण नागरिक बनावट कागदपत्रांचा वापर करून बऱ्याच काळापासून मुंबईत राहत होते. अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी सहा अफगाण नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व अफगाण नागरिक बनावट कागदपत्रांचा वापर करून मुंबईत राहत होते. चौकशीदरम्यान, ते कोणतेही वैध कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, ज्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी ही घोषणा केली. सर्व अफगाण नागरिकांची ओळख पटली आहे.

सहा नागरिकांना मायदेशी परत पाठवणार?
पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना लवकरच अफगाणिस्तानला प्रत्यार्पण केले जाईल. घटनेची माहिती देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दक्षिण मुंबई आणि धारावीच्या कुलाबा भागात कारवाई केली. या भागातून एकूण सहा अफगाण नागरिकांना अटक करण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलीस या सहा अफगाणी नागरिकांना पुन्हा अफगाणिस्तानला पाठविणार असल्याची माहिती समोर येत आहे.











