Benefits of eating green peas: हिरवे वाटणे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणत असतात. परंतु आता पावसाळातसुद्धा हिरवे वाटाणे मिळत आहेत. हिरवे वाटाणे खायला अतिशय चविष्ट असतात. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का हिरवे वाटाणे आरोग्यासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर असतात. आज आपण हिरवे वाटाणे खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आहारात हिरवे वाटाणे समाविष्ट करण्याचे फायदे काय आहेत.
भरपूर प्रोटीन असते-
हिरव्या वाटाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. वाटणे हा वनस्पती-आधारित प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. हृदयाच्या स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन खूप आवश्यक असते. यासोबतच, शरीराच्या स्नायूंसाठी देखील प्रोटीन खूप आवश्यक असते.
पचनक्रिया सुधारते-
हिरव्या वाटाण्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, फायबरमुळे अन्न आतड्यांमध्ये योग्य हालचाल करण्यास मदत होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या टाळता येतात. पावसाळ्यात बद्धकोष्ठतेच्या तक्रारी वाढतात. त्यामुळेच वाटाणे यापासून आराम देण्यास मदत करू शकतात.
डायबिटीसमध्ये फादेशीर-
रक्तातील साखर वाढल्याने डायबिटीसचा धोका असतो. हिरवे वाटाणे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. हिरव्या वाटण्यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखर अचानक वाढू देत नाहीत. त्यामुळे साखर नियंत्रित करण्यासाठी हिरवे वाटणे अत्यंत फायदेशीर आहेत.
कॅन्सरपासून बचाव-
तज्ज्ञांच्या मते, हिरव्या वाटाण्यांमध्ये, अँटी ऑक्सीडेन्ट असते. जे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. हिरवे वाटाणे फ्री रॅडिकल्स डॅमेज रोखतात. फ्री रॅडिकल्स डॅमेज झाल्याने सेल्स डॅमेज होतात. जे कॅन्सरचे स्वरूप घेऊ शकतात. त्यामुळे हिरवे वाटाणे खाणे फायदेशीर आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते-
हिरव्या वाटानाण्यांमध्ये व्हिटॅमिन्स सी, व्हिटॅमिन्स ए, जिंक आणि विविध पोषक तत्वे आढळतात. ज्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास विविध आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हिरवे वाटाणे खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
त्वचेसाठी फायदेशीर-
हिरव्या वाटाण्यांमध्ये अँटी-ऑक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन्स सी भरपूर प्रमाणात असल्याने ते त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिरवे वाटाणे खाल्ल्याने त्वेचवरील सुरकुत्या दूर होतात. चेहरा चमकदार बनतो. शिवाय केस गळणे कमी होतात. आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.





