भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारतात अभिमानाने तिरंगा फडकवण्यात आला होता. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची लाट उसळली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात असे एक शहर होते जिथे त्या दिवशी तिरंगा फडकवण्यात आला नव्हता? हो, आज आपण त्या शहराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी वेगळा ध्वज फडकवण्यात आला होता.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या शहरात तिरंगा फडकला नव्हता
छत्रपती संभाजीनगर हे शहर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ब्रिटिश काळात हे शहर हैदराबाद संस्थानाचा भाग होतं आणि 1960 साली ते महाराष्ट्रात समाविष्ट झालं.





