MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

गणेशोत्सवाच्या आधी राज्यात मुसळधार पाऊस बरसणार; 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बाप्पाच्या स्वागताच्या काळात पावसाची तीव्रता वाढू शकते. आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तवला, ते सविस्तर जाणून घेऊ...
गणेशोत्सवाच्या आधी राज्यात मुसळधार पाऊस बरसणार; 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

गणेशोत्सवाच्या पूर्वी राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले अनेक ठिकाणी पूर आले तर शेती पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आता कुठे पावसापासून दिला मिळाला असतानाच आता परत एकदा पावसाचा इशारा देण्यता आला आहे. या आठवड्यात घराघरात गणेशोत्सवाच्या उत्सवाचे आगमन होणार आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार बाप्पाच्या स्वागताच्या काळात पावसाची तीव्रता वाढू शकते. आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तवला, ते सविस्तर जाणून घेऊ…

अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.  धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसारख्या उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहील, तर काही ठिकाणी उन्हाळ्याप्रमाणे पावस आणि उन्हाचा बदलत खेळ पाहायला मिळेल. घाटमाथा तसेच पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता मुसळधार ते अत्यंत मुसळधार या प्रकारे बदलत राहण्याची शक्यता आहे.

विदर्भात मात्र आज आणि उद्या पुढील 48 तासांमध्ये पावसाची शक्यता नाही. पावसामुळे दमट हवामान असून उकाड्यामुळे त्रास होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बाप्पाच्या आगमनानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परभणी, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, तर काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार!

राज्यात पावसाचा तीव्रता काही दिवसांपासून कमी राहिली आहे. अधूनमधून हलक्या सरींचा पाऊस पडत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. आठवड्याभरापूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक धरणांमध्ये चांगली पाणी साठा वाढला असून पाण्याची तंगी काहीशी कमी झाली आहे. मात्र मराठवाड्यात पावसाची कमतरता अजूनही आहे, ज्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. या काळात शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी काहीसे चिंतेत आहेत.
मुंबईसह उपनगरांमध्ये 15 ऑगस्टला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. सकाळी चार वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. काही तासांच्या पावसामध्येच रस्त्यांना पावसाचा स्वरूप प्राप्त झाले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा थेट परिणाम हा मुंबईच्या लोकल सेवेवर झाला होता. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रशासनाकडून सध्या पावसाचा जोर पाहता उपायोजनांना सुरूवात करण्यात आली आहे.