अंमली पदार्थांची तस्करी थांबेना! मुंबईत DRI च्या कारवाईत 42 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून तब्बल 42.34 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ₹42 कोटी एवढी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई विमानतळावरील ड्रग्ज आणि गांजा तस्करीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हायड्रोपोनिक आणि इतर प्रकारच्या मादक पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. तस्करीसाठी विमानतळाचा वापर केल्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. एनसीबी आणि स्थानिक पोलिसांची कारवाई असून अनेक आरोपी अटक केले जातात, परंतु ही गुन्हेगारी अजूनही थांबलेली नाही. प्रवाशांनी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास देशातील कायदे आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शिक्षण, तपासणी आणि कठोर कारवाईवर भर देणे आवश्यक आहे.

42 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

गुप्त माहितीनुसार DRI च्या अधिकाऱ्यांनी दोन्ही संशयित प्रवाशांना विमानतळावर थांबवले. त्यांच्या सामानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगांमध्ये ठेवलेल्या नूडल्स, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये लपवलेला हा मोठा प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडला. प्राथमिक तपासात या पदार्थाचे नमुने NDPS फील्ड टेस्ट किट मध्ये घेतले असता तो प्रतिबंधित मादक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर अधिकाऱ्यांनी NDPS कायदा, 1985 अंतर्गत हा संपूर्ण 42.34 किलो अंमली पदार्थ जप्त केला. दोन्ही प्रवाशांना तात्काळ अटक केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, हे दोघेही आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटशी संबंधित असल्याची शक्यता तपासली जात आहे.

गांजा,अंमली पदार्थांमुळे होणारे नुकसान

गांजा आणि इतर अंमली पदार्थांचे सेवन शरीर आणि मनावर गंभीर परिणाम करते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते, स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्यावर ताण निर्माण होतो. दीर्घकालीन सेवनाने हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, पाचन समस्यांव्यतिरिक्त सामाजिक व कौटुंबिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची क्षमता कमी होते आणि कामकाजावरही विपरीत परिणाम दिसतो. अंमली पदार्थांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि समाजातील शिस्त बिघडते. त्यामुळे गांजा व अन्य मादक पदार्थांपासून दूर राहणे, योग्य मार्गदर्शन व शिक्षण देणे आणि शासनाच्या कठोर कायद्याचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News