Pratap Sarnaik – राज्याच्या परिवहन विभागातून एक महत्त्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील सीमा चौकी लवकरच बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत राज्य ट्रान्सपोर्ट युनियनने देखील सातत्याने निवेदन देऊन सीमा चौक्या बंद करण्याबद्दल मागणी केली होती. यानंतर आता राज्यातील सीमा चौकी लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सांगितले.
निर्णय कोणत्या कारणासाठी?
दरम्यान, अचानक हा निर्णय कोणत्या कारणासाठी घेतला गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे तसेच व्यावसायिक वाहनांच्या हालचालीतील समस्या, अडथळे दूर करणे हा आहे. 1966 मध्ये स्थापन झालेल्या या सीमा चौक्यांचा उद्देश म्हणजे परिवहन नियमांचे पालन करणे, वाहनांची हालचाल नियंत्रित करणे आणि रस्ते कर वसूल करणे असा होता. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या (RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
५०४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई…
या निर्णयामुळे महाराष्ट्र १८ इतर राज्यांप्रमाणे तंत्रज्ञानाधिष्ठित, आधुनिक, कागदविरहित परिवहन देखरेखीच्या प्रणालीचा अवलंब करणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र राज्याचा समावेश होणार आहे. यामुळे कार्यक्षमतेत वाढ होईल, वेळ लागणे…, गैरप्रवृत्ती रोखण्यास मदत होईल. महाराष्ट्रात मोटार परिवहन व सीमाशुल्क विभागांच्या संयुक्तपणे तपासणी नाक्यांसाठी “इंटिग्रेटेड चेक पोस्ट” प्रकल्प राबवण्यात आला होता. पण आता सीमा चौकी बंद करण्यात असल्यामुळं नुकसान भरपाई म्हणून संबंधित संस्थेला ५०४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.











