बहुतांश लोक आजही घराच्या मुख्य प्रवेशदारावर आजही अशोकाच्या पानांचे तोरण लावतात. अशोकाच्या पानांना शास्त्र आणि वास्तुशास्त्र दोन्हीमध्ये विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांचे तोरण लावले तर अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊया..
नकारात्मक ऊर्जा दूर राहते
लक्ष्मी देवी वास करते
अशोकाच्या पानांना शुभ मानले जाते आणि त्यांचे तोरण लावल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. मुख्य दरवाजा हा घराचे पवित्र स्थान मानले जाते आणि तोरण लावणे हे देवतेचे घरात स्वागत करण्यासारखे आहे, असे मानले जाते.
इच्छा पूर्ण होतात
शुभ कार्याच्या वेळी लोक आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांपासून बनवलेले तोरण बसवतात. यासोबतच पूजेच्या वेळी त्याची पाने देवी-देवतांना अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. पूजेच्या वेळी किंवा शुभ कार्यावेळी अशोकाच्या पानांचा वापर केल्याने देवता प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण होतात.
वास्तुदोष कमी करणे
अशोकाच्या पानांचे तोरण घरात वास्तुदोष कमी करण्यास मदत करते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. घराच्या मुख्य दारावर अशोकाच्या पानांचे तोरण लावणे हे वास्तुदोष कमी करण्यासाठी, घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी शुभ मानले जाते. अशोकाची पाने नकारात्मक शक्तींना दूर ठेवतात आणि घरात शांतता व समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. वास्तुशास्त्रानुसार, अशोकाच्या पानांचे तोरण लावल्याने घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते आणि घरात सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो.
अशोकाची पाने लावण्याचे महत्त्व
घराच्या मुख्य दारावर अशोकाच्या पानांचे तोरण लावण्याचे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व आहे. हे नकारात्मक ऊर्जा दूर करते, घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि वाईट शक्तींना प्रवेश करण्यापासून रोखते. तसेच, शुभ कार्यांमध्ये आणि सणांमध्ये हे तोरण लावल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घराचे सौंदर्यही वाढते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





