MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

सोमवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक; बहुतांश बाजार समित्यांमध्ये दरात घसरण

Written by:Rohit Shinde
राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे.
सोमवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक; बहुतांश बाजार समित्यांमध्ये दरात घसरण

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी चांगल्याचा वाढत आहेत. कारण बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे आवक नियमित नसल्याने कधी माल जास्त येतो तर कधी कमी, यामुळे बाजारभावामध्ये कमालीची अस्थिरता सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी 7 हजारांच्या पार पोहोचलेला दर आता 5 हजारांच्या आत आल्याचे दिसते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.

राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे.

सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार कायम

विविध बाजार समित्यांमध्ये आवक आणि गुणवत्तेनुसार दरात फरक दिसून येत आहे. 14 आणि 15 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार सोयाबीनला काही ठिकाणी समाधानकारक दर मिळाले असले तरी, काही बाजारांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

आज 15 डिसेंबर रोजी नागपूर बाजार समितीत लोकल सोयाबीनची 661 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. येथे किमान दर 3,800 रुपये, कमाल दर 4,416 रुपये तर सरासरी दर 4,262 रुपये प्रति क्विंटल इतका राहिला. नागपूरसारख्या मोठ्या बाजारात सरासरी दर 4,200 रुपयांच्या पुढे 4,262 रु इतका राहिल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आवक वाढल्यास दरावर दबाव येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

14 डिसेंबर रोजी औसा बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक 2,288 क्विंटल आवक झालीयेथे किमान दर 4,001 रुपये, कमाल दर 4,582 रुपये तर सर्वसाधारण दर 4,432 रुपये नोंदवण्यात आला. औसा बाजारात मिळालेला सरासरी दर राज्यातील इतर अनेक बाजारांच्या तुलनेत चांगला मानला जात असून, दर्जेदार मालाला जास्त भाव मिळत असल्याचे चित्र आहे

सोयाबीनच्या दरात अस्थिरता नेमकी कशामुळे?

महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात अलीकडे कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भिजला असून त्यामुळे उत्पादनाची प्रत ढासळली आहे. खराब गुणवत्तेमुळे बाजार समित्यांत दर घसरत आहेत. त्यातच बाजारपेठांमध्ये होणारी अस्थिर आवक आणि व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद यामुळे भावात चढ-उतार वाढले आहेत.

काही दिवशी आवक जास्त असल्याने दर कमी होतात, तर आवक घटली की अचानक वाढतात. या अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून स्थिर दर मिळण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आणि खरेदी धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.