हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते असे म्हणतात. या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे शालिग्राम रूप यांचा विवाह लावला जातो. तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर सर्वांना प्रसाद दिल जाते. तुळशी विवाहाला केळीचा मालपुआ नैवेद्य म्हणून बनवायला अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया केळीचा मालपुआ कसा बनवायचा.
साहित्य
- 2 पिकलेली केळी
- 1 कप गव्हाचे पीठ
- 1/4 कप किसलेले खोबरे
- 1/4 कप चिरलेला सुका मेवा (बदाम, काजू, पिस्ता)
- 1/4 टीस्पून वेलची पावडर
- 1/4 टीस्पून दालचिनी पावडर
- 1/4 कप साखर किंवा गूळ (चवीनुसार)
- तूप
कृती
- पिकलेले केळे एका भांड्यात चांगले मॅश करा जेणेकरून ते पूर्णपणे गुळगुळीत होईल.
- मॅश केलेल्या केळीमध्ये गव्हाचे पीठ, किसलेले खोबरे, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, दालचिनी पावडर आणि साखर किंवा गूळ घाला.
- गुळगुळीत पीठ बनवण्यासाठी सर्वकाही चांगले मिसळा. जर पीठ खूप घट्ट असेल तर तुम्ही त्यात थोडे पाणी घालू शकता.
- आता एक तवा गरम करून त्यावर थोडे तूप किंवा तेल टाका.
- मालपुआचे मिश्रण तव्यावर पॅनकेकसारखे पसरा.
- दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- गरम साखरेच्या पाकात तळलेले मालपुआ लगेच बुडवा. वर ड्रायफ्रुट्सने सजवा
- मालपुआ तुळशी विवाहाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत.
