वास्तुशास्त्रानुसार, आंघोळीनंतर काही गोष्टी अशा असतात ज्या लगेच करू नये. किंवा ती कामे करणे टाळावे. अन्यथा त्याचा प्रभाव हा आपल्या ग्रहांवर आणि परिणामी आपल्या आयुष्यावरही होऊ शकतो. त्यामुळे अशी कोणती कामे आहते जी अंघोळीनंतर करू नये जाणून घेऊयात….
लगेच स्वयंपाकघरात जाऊ नका
आंघोळ केल्यानंतर लगेच स्वयंपाकघरात जाणे किंवा स्वयंपाक करणे अशुभ मानले जाते. आंघोळीनंतर मन शुद्ध असते, त्यामुळे लगेच उष्णता असलेल्या स्वयंपाकघरात जाणे अशुभ मानले जाते, जे ग्रहांच्या संतुलनावर परिणाम करते.












