Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टी कधीच संपू देऊ नका; अन्यथा…

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या या पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा  घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. काही गोष्टी जर आपण पाळल्या नाहीत तर लक्ष्मी निघून जाते असं म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंचे डबे पूर्णपणे संपू देऊ नयेत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि वास्तूदोष निर्माण होतात, ज्यामुळे घरात आर्थिक अडचणी, तणाव आणि आजारपण येऊ शकते. आपल्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहावी म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घेऊया…

पीठ

पिठाचा डबा रिकामा असणे हे देखील अशुभ मानले जाते, कारण यामुळे घरात गरिबी येऊ शकते आणि अडचणी वाढू शकतात.  पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा ठेवू नका, त्यात थोडे पीठ असले तरी ते नवीन पिठाने भरून ठेवा.

हळद

हळद ही शुभ आणि पवित्र मानली जाते. हळदीचा वापर पूजा-अर्चनेत होतो, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी हळद आवश्यक आहे. हळदीचे डबे भरलेले असावेत. हळद स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती संपल्यास शुभ कार्यांमध्ये अडथळे येऊ शकतात.

मीठ

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील मीठ जर पूर्णपणे संपले, तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि वास्तुदोष निर्माण होतात, त्यामुळे मीठ कधीही संपू देऊ नये; ते भरलेले ठेवल्यास सकारात्मकता टिकून राहते आणि आर्थिक-आरोग्य समस्या दूर होतात. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते असे मानले जाते. ते संपल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणून मीठ नेहमी भरलेले ठेवावे. मिठाचे डबे रिकामे राहणे हे वास्तूदोष निर्माण होण्याचे एक कारण मानले जाते, ज्यामुळे घरात तणाव आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.

तांदूळ

तांदूळ हे अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तांदूळ संपणे हे गरिबी आणि अस्थिरतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील मीठ, हळद आणि तांदूळ यांसारख्या मूलभूत गोष्टी कधीही संपू देऊ नयेत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घरात दारिद्र्य, आजारपण व इतर समस्या येतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News