रस्त्याने चालत असताना अनेकवेळा आपण त्या ठिकाणी पडलेल्या वस्तू पाहतो, ज्या अत्यंत अशुभ मानल्या जातात. त्यामुळे या गोष्टींना ओलांडू नये किंवा स्पर्श करू नये आणि त्यांना दुरूनच टाळणे चांगले आहे. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे…
लिंबू-मिरची
लिंबू-मिरचीचा उपयोग वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी केला जातो आणि असे मानले जाते की ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे, रस्त्यावर पडलेल्या लिंबू-मिरचीवर पाय ठेवल्यास ती व्यक्ती त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव स्वतःवर घेते. जर लिंबू मिरची रस्त्यावर पडलेली दिसेल तर तिला ओलांडू नका किंवा स्पर्ष करू नका. त्यावर जर तुमचा पाय पडला तर नकारात्मक उर्जेचा जीवनावर प्रभाव पडतो आणि जीवनात विविध अशुभ घटना घडू लागतात. तुमच्या कामात अडचणी उभ्या राहतात असे म्हणतात.
केसांचा गुच्छ
रस्त्यावर केसांचा गुच्छ दिसल्यास, ज्योतिषशास्त्रानुसार त्याला स्पर्श न करता पुढे जावे, कारण असे मानले जाते की हे नकारात्मक शक्तींशी संबंधित असू शकते किंवा काळ्या जादूचा वापर असू शकतो. या गोष्टीमुळे कामात अडथळे येऊ शकतात. केसांचा वापर अनेकदा अशुभ विधी आणि काळ्या जादूसाठी केला जातो, म्हणूनच रस्त्यावर केसांचा गुच्छ दिसल्यास त्याला स्पर्श न करता निघून जाण्याचा सल्ला दिला जातो. केसांच्या गुच्छाला ओलांडल्याने तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडला आहात, त्यात अपयश येण्याची शक्यता आहे.





