MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

लाडक्या बहिणींनो ‘या’ पोर्टलवर ई-केवायसी करून घ्या, अन्यथा १५०० रूपये बंद झालेच म्हणून समजा…

Written by:Rohit Shinde
राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. या संदर्भात सरकारने परिपत्रक सुद्धा काढलं आहे.
लाडक्या बहिणींनो ‘या’ पोर्टलवर ई-केवायसी करून घ्या, अन्यथा १५०० रूपये बंद झालेच म्हणून समजा…

लाडकी बहीण योजनेतील महिलांकडून झालेले अनियमितता लक्षात घेत सरकार आता सजग झाले आहे. यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. या संदर्भात सरकारने परिपत्रक सुद्धा काढलं आहे.

ई-केवायसी करावी लागणार!

लाडकी बहीण या योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला सुद्धा घेत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यानंतर आता सरकारने महिलांचे ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. एक नजर टाकुयात परिपत्रकात नेमकं काय आहे. सदर अधिसूचनेनुसार “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचे e-KYC करायचे आहे.

सरकारच्या परिपत्रकानुसार…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या Web Portalवर सदरची e-KYC ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने या Web Portal वर लाभार्थ्यांना प्रथ्यक्षात e-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा Flowchart ‘परिशिष्ट – अ’मध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी Aadhar Authentication केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या योजनेंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील.

निकष बदलणार? आदिती तटकरेंचे उत्तर

लाडकी बहीण योजनेबाबत अलीकडेच काही प्रश्न उपस्थित झाले होते. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले अशी चर्चा सुरू असताना यावर मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष सुरुवातीपासून आहे तेच आहेत त्यात कोणताही बदल झालेला नाही.  पुढे त्या असंही म्हणाल्या की, प्रत्येक विभाग स्वतःचा डेटा स्वतंत्रपणे राखतो आणि महिला व बाल विकास विभाग हा डेटा मिळवण्यासाठी इतर विभागांशी समन्वय साधतो. ही एक नियमित प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे  सांगत यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.