Onion Price: महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली; दरातील घसरण कायम!

देशभरात कांद्याच्या दरात घसरण ही सध्याची समस्या आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता. आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादकांच्या अडचणी गत दोन वर्षांपासून कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. कारण, परदेशातील निर्यातीवर येणारे निर्बंध, पावसामुळे कांद्याची होणारी हानी या संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे अलीकडच्या काळात बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढताना दिसत आहे. त्यामुळे दरांमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.

आवक वाढल्याने कांद्याच्या दरामध्ये घसरण 

देशभरात कांद्याच्या दरात घसरण ही सध्याची समस्या आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता. आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याच्या या घसरणीमुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनाही फायदा होतो, कारण कमी किमतीत कांदा मिळतो. मात्र शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीत साठा व्यवस्थापन आणि उत्पादनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्याचा अभ्यास करून भाव स्थिर ठेवण्याचे उपाय करणे गरजेचे आहे.

कांद्याची उच्चांकी आवक, बाजारात दर कमी

राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 35 हजार 547 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 53 हजार 370 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 272 ते 1454 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 560 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

राजस्थान, गुजरातच्या कांद्याची आवक वाढणार

लवकरच राजस्थान आणि गुजरातमधूनही नवीन कांद्याचा पुरवठा वाढेल. या सर्व घटकांमुळे बाजारात कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असून, त्यामुळे भाव आणखी कोसळू शकतात, असा इशारा कांदा निर्यातदारांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अशी बातमी समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News