Panchmukhi Hanuman : हनुमानाने पंचमुखी अवतार का घेतला? वाचा त्यामागील कथा

पंचमुखी हनुमान शक्ती, भक्ती आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा प्रवेश रोखला जातो आणि सुख-समृद्धी येते. पंचमुखी हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते. या दिशेला लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भीती नाहीशी होते.

पंचमुखी हनुमानाचे पाच चेहरे कोणते?

पंचमुखी हनुमानाच्या पाच चेहऱ्यांमध्ये हनुमान, नरसिंह, गरुड, वराह आणि अश्व मुख यांचा समावेश आहे. हे प्रत्येक मुख शक्ती, संरक्षण आणि विविध दैवी गुणांचे प्रतीक आहे.

  • हनुमान मुख : हे मुख्य रूप आहे, जे भक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.
  • नरसिंह मुख : हे रूप भीती आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आहे.
  • गरुड मुख : हे रूप विष आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते.
  • वराह मुख : हे रूप समृद्धी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आहे.
  • अश्व मुख : हे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे. 

हनुमानाने पंचमुखी अवतार का घेतला?

कथेनुसार, जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्ध चालू होते, तेव्हा आपले सैन्य हरत असल्याचे पाहून रावणाने आपल्या मायावी भाऊ अहिरावणकडे मदत मागितली. अहिरावण माता भवानीचा महान भक्त आणि तंत्रविद्येत उत्तम तज्ञ होता. आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर त्याने प्रभू रामाच्या संपूर्ण सैन्याला झोपवले आणि राम-लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले. अहिरावण हे भवानी मातेचे परम भक्त असल्याने. त्यांनी माता भवानीच्या नावाने पाच दिशांना पाच दिवे लावले होते. त्याला वरदान मिळाले होते की त्याला केवळ तेव्हाच मारले जाऊ शकते जेव्हा त्याच्या पाताल लोकात जळणारे पाचही दिवे एकाच वेळी विझवले जातील. त्यामुळे प्रभू श्रीरामाला वाचवण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण करून एकाच वेळी पाचही दिवे विझवले आणि अहिरावणाचा वध केला. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News