सिध्दार्थ जाधवचा पहिला, गाजलेला ‘तो’ सिनेमा आता दिसणार छोट्या पडद्यावर

Rohit Shinde

आजवर सिद्धार्थ जाधवने असंख्य चित्रपट केलेत. काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे मनात राहतात. ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट विशेष गाजलेला होता. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो, जी फक्त यशस्वीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळंच असतं. सिद्धार्थ जाधवचा हा पहिला चित्रपट जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहीला. त्यानंतर हा चित्रपट आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे.

‘आता थांबायच नाय’, गाजलेला चित्रपट

सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता. “रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करतंय. सुमित राघवन, दिलीप रावळकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळं मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंबच जवळ आलं. 25 दिवस, मग 50 दिवस आणि ते तुफान हाऊसफुल शोज, ती आठवण कायम लक्षात राहील.” मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक संयत बाप, न बोलणारा, पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडासा हरवलेला, पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा, ह्या पात्रामध्ये सिद्धार्थने केवळ अभिनय केला नाही त्यानं ते जगून दाखवलं.

सिध्दार्थ जाधव मुरलेला कलाकार

सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता आहे. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला सिद्धार्थ भावनिक भूमिकांमध्येही तितकाच प्रभावी ठरतो. “दे धक्का”, “सिंधुताई सपकाळ” आणि “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भावनिक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. त्याचा अभिनय संयत, प्रभावी आणि मनाला भिडणारा असतो. दुःख, संघर्ष आणि प्रेमाच्या भावना तो सहजतेने व्यक्त करतो. अशा भूमिका साकारताना त्याचे अभिनय कौशल्य अधिक खुलते. विनोदाच्या बाहेर पडून तो एका परिपक्व कलाकाराच्या भूमिकेत दिसतो. सिद्धार्थचा अभिनय प्रेक्षकांना हसवतोच, पण त्याचबरोबर अश्रूंनी डोळेही पाणावतो.

ताज्या बातम्या