Tirupati Balaji Temple : बालाजीला केस दान का करतात? यामागील आख्यायिका वाचाच

असे मानले जाते की जो कोणी मंदिरात केस दान करतो त्याला दहापट पैसे परत मिळतात. शिवाय, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतो.

देशातील श्रीमंत देवस्थानाच्या यादीत तिरुपती बालाजीचे ( Tirupati Balaji Temple) नाव हमखास पहिल्या स्थानावर घेतले जाते. आंध्र प्रदेशातील या मंदिरात फक्त दक्षिण भारतीयच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मोठ्या प्रमाणावर येतात आणि बालाजीचे आशिर्वाद घेतात. देशातील श्रीमंत आणि दिग्गज व्यक्तीही बालाजीच्या चरणी माथा टेकवतात. बालाजीच्या बाबतीत अनेक खास आणि रहस्यमयी गोष्टी आहेतं. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे भाविक बालाजीला गेले की केस कापतात. या मंदिरात भक्तांनी केस अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे परंतु यामागील आख्यायिका तुम्हाला माहितेय का? चला जाणून घेऊयात.

केस दान करण्यामागचं कारण काय आहे

आख्यायिकेनुसार, जगाच्या कल्याणासाठी एक यज्ञ करण्यात आला होता. या यज्ञाचे फळ कोणाला मिळेल असा प्रश्न निर्माण झाला. हे ठरवण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर सोपवण्यात आली. भृगु प्रथम ब्रह्मा आणि नंतर भगवान शिव यांच्याकडे गेले, परंतु त्यांना यज्ञेचे फळ देण्यासाठी दोघेही अयोग्य वाटले. शेवटी, ते भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंड धाम पोहोचले, जिथे ते विश्रांती घेत होते.

भृगु ऋषी आलेत हे विष्णूच्या लक्षात आलेच नाही. भृगु ऋषींना हा अपमान वाटला आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. विष्णूजींनी अत्यंत नम्रतेने ऋषींचे पाय धरले आणि विचारले, “हे ऋषी! तुमचे पाय दुखत आहेत का?” हे ऐकून भृगु ऋषींना त्यांची चूक कळली आणि त्यांनी भगवान विष्णूंना बलिदान देण्याचा निर्णय घेतला.

लक्ष्मीने बदला घेण्याचं ठरवलं

भृगु ऋषींनी भगवान विष्णूंचा केलेला अपमान पाहून आई लक्ष्मी दुःखी झाली. तिला या अपमानाचा बदला घ्यायचा होता, परंतु भगवान हरि यांनी नकार दिला. संतापून लक्ष्मी वैकुंड धाम सोडून गेली. आई लक्ष्मी पृथ्वीवर राहू लागली आणि विष्णूजी तिला शोधण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी, भगवान विष्णूचा पृथ्वीवर श्रीनिवास म्हणून जन्म झाला. भगवान विष्णूंना मदत करण्यासाठी भगवान शिव आणि ब्रह्मा यांनीही गाय आणि वासराचे रूप धारण केले. लक्ष्मीचा पृथ्वीवर पद्मावती म्हणून जन्म झाला. काही काळानंतर, श्रीनिवास आणि पद्मावतीचे लग्न झाले.

लग्नाच्या काही विधी पूर्ण करण्यासाठी, भगवान विष्णूने भगवान कुबेराकडून पैसे उधार घेतले आणि कलियुगाच्या अखेरीस व्याजासह कर्ज फेडण्याचे वचन दिले. तेव्हापासून, भक्त कुबेराचे भगवान विष्णूचे ऋण फेडण्यासाठी काही ना काही पैसे दान करत आहेत. केस (Tirupati Balaji Temple) हे देखील एक सामान्य दान आहे. असे मानले जाते की जो कोणी मंदिरात केस दान करतो त्याला दहापट पैसे परत मिळतात. शिवाय, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News