Ratna Shastra : तुम्हांलाही सतत राग येतोय??मग हे रत्न घाला आणि जादू पहा

मोती घालण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ते राग आणि तणाव कमी करतात. त्यांचा मनावर सौम्य परिणाम होतो, हळूहळू शांतता येते.

Ratna Shastra : प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. आपल्यापैकी अनेकांना लगेचच एखाद्या गोष्टीवरून राग येतो. आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, तणाव, आणि आर्थिक अडचणी यामुळे माणसे छोट्या छोट्या गोष्टींवरून राग राग करतात. साहजिकच यामुळे भांडणे होण्याची शक्यता जास्त असते. तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत राग येत येतो का?? यावर आज आम्ही तुम्हाला खास उपाय सांगणार आहोत. एक अस रत्न जे तुम्ही घातल्यानंतर तुमचा राग आपोआप शांत होईल आणि तुम्ही नॉर्मल मनुष्यासारखे वागाल. ज्या रत्नाबद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय ते रत्न आहे मोती, जो चंद्राशी संबंधित एक अतिशय शक्तिशाली रत्न मानला जातो.

चंद्राचा प्रभाव आणि मोत्याची भूमिका

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र मन, भावना, संवेदनशीलता आणि मानसिक संतुलन दर्शवितो. कुंडलीत मजबूत चंद्र शांत, संयमी आणि संतुलित व्यक्तीला जन्म देऊ शकतो. परंतु, कमकुवत चंद्र अस्थिरता, तणाव, राग, अस्वस्थता, चिंता आणि अतिविचार यासारख्या समस्या वाढवू शकतो. चंद्राचा रत्न असल्याने मोती मन शांत करण्यात आणि भावना स्थिर करण्यात प्रभावी मानला जातो. मोती परिधान करणाऱ्याला आराम, संयम आणि मानसिक शक्ती देतो.

मोती घालण्याचे फायदे (Ratna Shastra)

मोती घालण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ते राग आणि तणाव कमी करतात. त्यांचा मनावर सौम्य परिणाम होतो, हळूहळू शांतता येते. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक विचार कमी होतात, निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.  घरात आणि कामाच्या ठिकाणी संतुलित वातावरण राहते. ज्यांना क्षुल्लक गोष्टींवरून राग येतो त्यांच्यासाठी मोती हा एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो.

मोती घालण्याची योग्य वेळ

ज्योतिषशास्त्रात, सोमवार हा चंद्र आणि मोत्यांसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. रत्न घालण्यापूर्वी, गंगाजल, दूध आणि मध वापरून रत्न शुद्ध करा. या द्रवांमध्ये मोती थोड्या काळासाठी भिजवणे शुद्ध मानले जाते. त्यानंतर, प्रार्थना करत मोती परिधान करा. Ratna Shastra

कोणत्या धातूमध्ये मोती घालावेत?

चांदीमध्ये मोती घालणे सर्वात शुभ मानले जाते. चांदी स्वतःच मानसिक शांती वाढवते म्हणून, चांदीमध्ये मोती घालल्याने त्याचे परिणाम अधिक लवकर दिसून येतात. ज्योतिषशास्त्रानुसार, करंगळीत मोती घालणे कर्क, मीन, वृश्चिक आणि मेष राशीसाठी शुभ मानले जाते. जर कुंडलीत चंद्र कमकुवत असेल किंवा वारंवार तणाव आणि राग येत असेल तर हे रत्न अधिक प्रभावी ठरू शकते. प्रत्येक रत्नाची ऊर्जा खूप शक्तिशाली असते. म्हणून, ते घालण्यापूर्वी आधी तुमची कुंडली समजावून घ्या.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News