धक्कादायक! कर्नाटकात प्राणी संग्रहालयात 28 काळविटांचा अचानक मृत्यू; उच्चस्तरीय चौकशी होणार!

बेळगाव जवळील कित्तूर राणी चन्नमा प्राणी संग्रहालयातील तब्बल 28 काळविटांचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.

बेळगावजवळील भूतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा लघु प्राणीसंग्रहालयातील वातावरण सध्या चिंताजनक आहे. कारण, गेल्या काही दिवसांत येथे तब्बल २८ काळविटांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा आकडा मोठा असल्याने आणि मृत्यूचे कारण संसर्गजन्य असण्याची शक्यता असल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा मृत्यू जिवाणू संसर्गामुळे झाला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे. मरण पावलेल्यांमध्ये सुरुवातीला ८ हरणे होती, त्यानंतर आज आणखी २० हरणे एकाएकी मरण पावली. या घटनेची माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी त्वरित या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार -वनमंत्री

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले आहेत. शनिवारी प्राणी संग्रहालयातील वीस काळविटांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे वन खात्यात देखील खळबळ माजली आहे. नोव्हेंबर 13 रोजी आठ काळविटांचा मृत्यू झाला होता. केवळ तीन दिवसांच्या कालावधीत अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाल्याने या मृत काळविटांच्या मृत्यूचे कारण शोधणं हे वन विभागापुढे आव्हान बनलं आहे.

बॅक्ट्येरिया इन्फेक्शन मुळे मृत्यू झाल्याची शंका

बॅक्ट्येरिया इन्फेक्शन मुळे मृत्यू झाल्याची शंका वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे. असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नागराज यांनी प्राणी संग्रहलयाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली. दोन दिवसापूर्वी मृत झालेल्या काळविटांचे मृतदेह तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. आता शनिवारी मृत झालेल्या काळविटांच्या मृतदेहांची तपासणी करण्यात येणार आहे. म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथून पशु वैद्यकीय तज्ज्ञ काळविटांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी येत आहेत. मात्र, अवघ्या तीन दिवसांत 28 काळविटांचा मृत्यू झाल्याने वन्य जीव सुरक्षा हा सरकारसमोरील यक्ष प्रश्न बनला आहे.

दुसरीकडे, या संवेदनशील प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी पवन करनिंग यांच्याकडून योग्य आणि त्वरित माहिती मिळत नसल्यामुळे प्रशासनावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाच्या इतिहासातील एवढ्या मोठ्या संख्येने प्राण्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याने येथील उर्वरित हरणांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News